तुळींज पोलीस ठाण्यामध्ये हरवलेल्या वा चोरीस गेलेल्या वस्तूं बद्दल करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्यांचा तपास करून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मिरारोड भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनानिमीत्त तक्रारदार यांना दिनांक ०१/१०/२०२१ रोजी परत करण्यात आला. सदर कार्यक्रमादरम्यान सोन्याचे दागीने, २ कार, ३ रिक्षा , ४ मोटारसायकल व २४ मोबाईल असा एकूण १४,३६,०००/- रूपये किंमतीचा १४ गुन्हयांमधील मुद्देमाल कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करून तक्रादार यांना परत देण्यात आला आहे. सदरचा कार्यक्रम हा वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तुळींज पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कांबळे यांचे हस्ते पार पडला आहे. त्याचप्रमाणे माणिकपुर पोलीस स्टेशन, अर्नाळा पोलीस स्टेशनच्या वतीने देखील दाखल गुन्हयातील मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्यात आला. तक्रारदार यांना त्यांचे सोन्याचे दागीने, मोटारसायकल, कार, रिक्षा व गहाळ मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
